उमरगा ते मुंबई चालत आलेल्या मराठा तरुणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; मराठा आरक्षणासाठी 580 किमींची पायपीट
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उमरगा ते मुंबई असे 580 किमी चालत आलेल्या तरुणांना वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भेटले. मुख्यमंत्र्यांनी या तरुणांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या तरुणांना दिली.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी या तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी धाराशीव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव आणि विश्वजीत चुंगे या युवकांनी उमरगा ते मुंबई असा 580 कि.मी चा प्रवास पायी केला.
यासाठी त्यांना 13 दिवस लागले. मुंबईत आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवास्थानी भेट घेऊन आपले निवेदन दिले.







